०२ एप्रिल २०२६

कुंडलवाडीत के.रामलु प्रतिष्ठान तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने



*नगराध्यक्षा चषक 2026 चे आयोजन..

कुंडलवाडी प्रतिनिधी

कुंडलवाडी नगरीचे भाग्य विधाते माजी नगराध्यक्ष के.रामलु प्रतिष्ठान तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे शॉर्ट बॉण्ड्री नाईट चे खुले सामने,नगराध्यक्षा चषक-2026 क्रिकेट स्पर्धा येथील नगराध्यक्षा प्रेरणा गजानन कोटलावार मित्रपरिवारातर्फे पहिले वर्ष दि.12 एप्रिल 2026 पासून येथील मिलिंद प्राथमिक व माध्यमिक शाळा समोरील मैदानावर 

आयोजित करण्यात येणार आहेत.प्रवेश फी 1500 रू.आकारण्यात येणार आहे.

इच्छुक क्रिकेट संघाने जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावे.असे आवाहन आयोजकांचा वतीने करण्यात आले आहे.

यास्पर्धेतील प्रथम विजेता संघाला कै.के.रामलू यांच्या स्मरणार्थ 55 हजार 555 रू.पारितोषिक,द्वितीय विजेत संघाला कै.सदाशिव नारायण -याकावार यांच्या स्मरणार्थ 33 हजार 333 रू.पारितोषिक तर तृतीय विजेता संघास कै.शशिकलाबाई गोविंदू उत्तरवार स्मरणार्थ 22 हजार 222 रू.रोख पारितोषिक मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार.

तसेच मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक 3100 रू.साईरेड्डी राजाराम ठक्कुरवार अध्यक्ष के.रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार,उत्कृष्ट खेळाडु पारितोषिक 3100 रू.पारितोषिक महाराजा गणेश मंडळ वंजारगल्लीतर्फे देण्यात येणार,मॅन ऑफ द मॅच फाईनल मॅच 3100 रू.पारितोषिक कै.विठ्ठल नारायण माहेवार यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार,

फस्ट हॅट्रिक विकेट 3100 रू.पारितोषिक विष्णु नागेश आरशेवार यांच्यातर्फे देण्यात येणार,फस्ट हॅट्रिक फोर 3100 रू.पारितोषिक स्वराज्य गणेश मंडळ वंजारगल्ली तर्फे देण्यात येणार,फस्ट ५० टि पारितोषिक 3100 रू.रमेश हनमंलू ईरलावार भाजप गटनेते तथा नगरसेवक प्रभाग एक यांच्यातर्फे देण्यात येणार,बेस्ट बॅट्समन 3100 रू.पारितोषिक बंटी सायन्ना ठक्कुरवार मंडळ अध्यक्ष, भा.ज.पा.कुंडलवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार,बेस्ट बॉलर 3100 रू.पारितोषिक संजय शंकर गोणेलवार नगरसेवक न.प.कुंडलवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार,बेस्ट कीपर 3100 रू.पारितोषिक जेष्ठ क्रिकेट खेळाडू पठाण अखिल खान रॉयल ड्रेसेस कुंडलवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार,बेस्ट फिल्डर म्हणून 3100 रू.पारितोषिक व्यंकटेश पोशट्टी सब्बनवार नरेश ड्रेसेस,कुंडलवाडी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.

तरी स्पर्धेच्या नोदणीसाठी दत्तू हामंद - मो.9370966230,अजय भोरे- मो.9588617813,नरेश गट्टूवार- मो.7887351564,साहेबराव गुडमुलवार- मो.9766213128,शुभम मदिकुंटावार -मो.7219848318 यांच्याशी संपर्क साधावे.असे आवाहन नगराध्यक्षा प्रेरणा गजानन कोटलावार मित्रपरिवारातर्फे करण्यात आले.

२३ मार्च २०२६

कुंडलवाडीत ईदूल फितरची नमाज उत्साहात संपन्न,ईदगाह समितीतर्फे मान्यवरांचा सत्कार



कुंडलवाडी वार्ताहर 

ईदूल फितर रमजान ईद निमित्त शहरातील मुस्लिम समाज बांधव ईदगाह येथे सामुहिक नमाज आदा केली. यावेळी ईदगाह समितीचा वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.मान्यवरातर्फे मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आले.

      शहरातील ईदगाह येथे दि.21 मार्च शनिवार रोजी शहरातील सर्व मुस्लिम बांधव ईदगाह येथे शांततेत सामुहिक ईदची नमाज आदा केली.

यावेळी हाफिज वसिमसाब मिस्बाही ईद निमीत्त उपस्थिताना ईदचे महत्व आदी विषयावर प्रवचन देत ईदगाह समितीने मागील एक वर्षाचा कार्यकाळात ईदगाह येथे केलेल्या विकास कामा संदर्भात माहिती दिली.मुन्वर मस्जिदचे ईमाम हाफिज वसिमसाब मिस्बाही यांच्या मागे शांततेत उत्साहात मुस्लिम समाज बांधव ईदची सामुहिक नमाज आदा केली.यावेळी खुदबाह आणि दुवा जामा मस्जिदचे ईमाम आलीम खुदूस साहाब यांनी केले.तदनंतर ईदगाह समितीचा वतीचे अध्यक्ष सय्यद मंसूर अली,उपाध्यक्ष मोहम्मद अफजल व समितीचे सदस्य यांच्यावतीने नगर परिषद नगराध्यक्ष प्रतनिधी गजानन कोटलावार,सपोनी.ज्ञानेश्वर शिंदे,पोउनी.गजेंद्र मांजरमकर,तलाठी पवण ठकरोड,भाजप गटनेते रमेश ईरलावार,नगरसेवक प्रदीप खेळगे,भाजपचे नवनियुक्त मंडळ अध्यक्ष बंटी ठकरवाड यांचा सत्कार करण्यात आला.मान्यवरातर्फे मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच् देण्यात आले.

यावेळी ईदगाह समितीचे अध्यक्ष सय्यद मंसूर अली,उपाध्यक्ष मोहम्मद अफजल,ईदगाह समितीचे माजी अध्यक्ष सय्यद ईसताक अली,रशिदखान पठाण, गुलजार मस्जिद हाफीज गुलाम यासीन साहाब,हाफीज अमीरूल हसन साहाब,हाफीज मुस्ताख साहाब,मुन्वर मस्जिद अध्यक्ष मोहम्मद नजिर मोहम्मद ईसाख,पठाण नजिर मौलाना,माजी नगरसेवक शेख बशीर सहाब,गुलजार मस्जिद अध्यक्ष हाजी ईब्राहीमसाब,उपाध्यक्ष शेख बशिर साहाब,

बिलाल मस्जिद अध्यक्ष पठाण जलिल सहाब,उपाध्यक्ष हाजी मुजाहिद साहाब,ईदगाह समितीचे सदस्य अ.जावेद हाजी.अ.जलिल,शेख वहाब सिरजोदीन,हाजी अब्दुल करीम खुरेशी,

शेख सलीम अहेमदजानी,शेख अलीम अब्दुलमियाॅ,पठान रियाज मैनोदीन,शेख बशीर मौलाना,आदीसह मोठ्यासंख्येत मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनातर्फे ईदगाह परिसरात स्वच्छता आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते.याबद्दल ईदगाह समितीचे उपाध्यक्ष मोहम्मद अफजल नगर परिषद प्रशासन,पोलिस प्रशासन आणि महसुल प्रशासनाचे आभार मानले.

यासाठी ईदगाह समितीतर्फे पाठपुरावा करण्यात आला होता.

ईदगाह येथे कायदा व सुव्यवस्था आबादीत नादावे यासाठी सपोनी.ज्ञानेश्वर शिंदे,पोऊनी.गजेंद्र मांजरमकर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केले होते.

१९ मार्च २०२६

पशुवैद्यकीय क्षेत्राचा 'भीष्मपितामह' हरपला: डॉ. नारायणराव जोशी यांचे ९२ व्या वर्षी निधन



पदविकाधारक पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते आणि भारतीय पशु चिकित्सा सेवा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव विठ्ठल जोशी यांचे १५ मार्च २०२६ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशातील पशुवैद्यकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली असून, एका संघर्षशील पर्वाचा अंत झाला आहे.


५७ वर्षांचे अद्वितीय नेतृत्व

डॉ. जोशी साहेबांनी तब्बल ५७ वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संघटनेचे नेतृत्व केले, जो एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ, महाराष्ट्रचे ते दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी  संघटनेत मोलाची पदे भूषवून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले.


स्वतंत्र कौन्सिलसाठी आयुष्यभराचा ध्यास

पदविकाधारक पशुवैद्यकांना व्यावसायिक मान्यता आणि शैक्षणिक दर्जा मिळावा, हा त्यांच्या आयुष्याचा एकमेव ध्यास होता. १९७१ च्या अधिनियमानुसार महाराष्ट्रात मिळालेली नोंदणी व्यवस्था १९९७ मध्ये केंद्र सरकारच्या कायद्यामुळे रद्द झाली, ही त्यांच्यासाठी मोठी वेदना होती. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी 'स्वतंत्र दुय्यम पशुवैद्यकीय परिषद' स्थापन व्हावी, यासाठी लढा दिला.


सामाजिक आणि कर्मचारी चळवळीतील योगदान

केवळ पशुवैद्यकीय क्षेत्रच नव्हे, तर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पुणे जिल्हा नेतृत्वातही त्यांचा मोठा वाटा होता. हजारो कर्मचाऱ्यांना हक्काची घरे (फ्लॅट्स) मिळवून देण्यासाठी त्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मोलाचे कार्य केले. स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाज आणि संघटना मोठी मानणारा हा 'कर्मयोगी' आज आपल्यातून निघून गेला आहे.


"डॉ. जोशी साहेबांचे अपूर्ण स्वप्न (स्वतंत्र कौन्सिल) पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल," अशा भावना डॉ. के.बी. कासराळीकर  व इतर सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

१८ मार्च २०२६

भाजपा नगराध्यक्षातर्फे आयोजित ईफ्तार पार्टीने हिंदू–मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

 भाजपा नगराध्यक्षातर्फे आयोजित ईफ्तार पार्टीने हिंदू–मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश.

कुंडलवाडी प्रतिनिधी.


ईस्लाम धर्मातील पवित्र रमजान मास निमित्ताने भारतीय जनतापक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा वतीने येथील के.रामलू मंगल कार्यालय येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.नगरध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या वतीने  आयोजित ईफ्तार पार्टीने दिला हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आयोजित इफ्तार पार्टीत शहरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवले होते.

या कार्यक्रमाचा माध्यमातून समाजात बंधुभाव,एकोपा,धार्मिक एकात्मता आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा तसेच हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश अधिक दृढ व्हावा, हा उद्देश देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा, शांतता आणि परस्पर सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक एकत्र येऊन इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते.त्यामुळे कार्यक्रमाला सर्वपक्षीय व सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झाले होते.

या ईफ्तार पार्टीत नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,विद्युत वितरण कार्यालय कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टूवार,शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा नगरसेवक राजेश्वर उत्तरवार,डाॅ.नगरेश बोधनकर,हाफीज वसीम रझा मिसबाही,ईदगाह समितीचे अध्यक्ष सय्यद मंसूर अली,उपाध्यक्ष मोहम्मद अफजल,जामा मस्जिद अध्यक्ष सिराज पट्टेदार,ईदगाह समितीचे सदस्य अ.जावेद हाजी.अ.जलिल,शौकत ईनामदार,शेख अलीम,सैफ खुरेशी,फाजलखान,

शेख सदाम,अब्दूल माजिद,प्रा.यासिन पठाण,शेक अजिम,शेख जावेद टेलर,ईसाख पठाण,जावेद पट्टेदार,खयुम बारूदवाले,जब्बार खान,बबलू रहिम पेंटर,नगरसेवक प्रदीप खेळगे,संजय खुळगे, गंगाधर कोटलावार, मारोती कोटलावार,संजय भास्कर,भीम पोतनकर, सोनू सब्बनवार,शेख मुखत्यार,अजय गट्टूवार नगर परिषद कार्यालय अधिक्षक प्रविण श्रृंगारे,व त्यांचे सहकारी शिंदे कृष्णा,अजय यलगंदकर, हेमचंद्र वाघमारे,प्रकाश भोरे,शंकर जायेवार,जनार्दन भोरे,मारोती करपे,मोहन कंपाळे,धोंडीबा वाघमारे,शुभम ढिलोड,सय्यद माजिद,अंजू कुमार गंटूवार,विजय वाघमारे,साहेबराव वाघमारे सह

विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार करत परस्परांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम कुंडलवाडी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पारपाढला.

०९ मार्च २०२६

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे राज्यस्तरीय NQAS मूल्यांकन संपन्न आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर NQAS टीमकडून समाधान

 ग्रामीण रुग्णालय भोकर येथे राज्यस्तरीय NQAS मूल्यांकन संपन्न 

आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर NQAS टीमकडून समाधान



भोकर :- नांदेड जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर ता.भोकर जि.नांदेड येथे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया आज दि. ९ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडली.  डॉ. संजय पेरके जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ राजाभाऊ गुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पूर्वतयारीबद्दल आणि ग्रामीण रुग्णालय भोकरच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल मूल्यांकन समितीने विशेष समाधान व्यक्त केले आहे.


प्रमुख उपस्थितांची उपस्थिती या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय समितीचे प्रतिनिधी म्हणून नॅशनल असेसर डॉ. अश्विनी वाघे मॅडम नागपूर आणि डॉ. प्रियंका साबळे मॅडम कोल्हापूर यांनी उपस्थित राहून ग्रामीण रुग्णालय भोकर येथील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली व मार्गदर्शन केले.


* प्रशासकीय मार्गदर्शनः हे मूल्यांकन यशस्वी करण्यासाठी डॉ. संजय पेरके सर, डॉ राजाभाऊ बुट्टे सर यांनी वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य केले.


* लक्ष्य २०२६ः शासनाच्या उद्दिष्टानुसार डिसेंबर २०२६ पर्यंत NQAS मानांकित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.


* स्थानिक टीम डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे मूल्यांकनावेळी उपस्थित होते.


* समन्वयः जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक (DQAC) डॉ. शामसुंदर लोखंडे, डॉ.व्यंकटेश गुडे, डॉ अर्चना तिवारी मॅडम, डॉ रुबी मॅडम यांनी या संपूर्ण प्रक्रियेत समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.

* भोकर ग्रामीण रुग्णालय येथील माहिती पावर पॉईंट प्रझेन्टेशन (पीपीटि) द्वारे सत्यजीत टिप्रेसवार यांनी माहिती सादर केली.

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, स्वच्छता, दप्तर तपासणी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता पाहून समितीने सकारात्मक दाद दिली आहे. या मूल्यांकनामुळे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येतील. ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, इन्चार्ज सिस्टर, अधिपरीचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, वर्ग -3, वर्ग -४ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन काम केले.

०५ मार्च २०२६

सगरोळी व गंजगाव येथे मांजरा नदीपात्रात विना रॉयल्टी बेकायदेशीर रेती उत्खनन; कारवाईची मागणी



गौतम गावंडे | बिलोली

बिलोली तालुक्यातील सगरोळी व गंजगाव परिसरातील मांजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर विना रॉयल्टी बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी बिलोली तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सगरोळी व गंजगाव परिसरातील मांजरा नदीपात्रातून काही व्यक्तींकडून पोकलेन व जेसीबीसारख्या अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन केले जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, हायवा व डंपरच्या माध्यमातून रेतीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाला मोठा महसुली तोटा होत असून नदीपात्रातील नैसर्गिक समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या बेकायदेशीर उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होण्याचा धोका निर्माण होत असून भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार तसेच रेती ठेकेदार यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करून बेकायदेशीर उत्खनन थांबवावे, उत्खननासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करावी, तसेच नदीपात्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखरेख वाढवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. तसेच रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून जीपीएस प्रणालीची पडताळणी करावी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर गौतम गावंडे, दयानंद भद्रे, शंकर पवारे, दिपक केसराळीकर व उत्तम घाटे  सिद्धार्थ कांबळे कुंडलवाडीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

२२ फेब्रुवारी २०२६

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!




नांदेड (प्रतिनिधी):-  जिल्हा मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी आरोग्य सेवा ग्रामीण भागातील जन सामान्य गरजू लोकांना पर्यंत पोहचावी यासाठी त्यांनी रुजू झाले तेव्हा पासून जिल्हातील सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र यांना भेटी आढावा बैठक घेऊन नियोजन केले. त्यामुळे राज्य स्तरावर जिल्हाला अनेक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. 

दि. २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ सोहळा महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती आरोग्य राज्य मंत्री नामदार मेघना ताई साकोरे -बोर्डिंकर  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा मध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला 

या मध्ये  नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ मोहनी सुर्यवंशी, प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा ता. हदगांव , औषध निर्माण अधिकारी आडे प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम बु व आशा स्वयंसेविका पुरस्कारार्थी श्रीमती रिना अशोक पवार उपकेंद्र लहान मौजे चेनापूरतांडा प्राथमिक आरोग्य केंद्र येळेगाव ता. अर्धापूर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे मा. आरोग्य मंत्री  नामदार श्री प्रकाशजी आबिटकर, नामदार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व उपस्थित आयुक्त कादंबरी बलकवडे, आरोग्य सचिव ई रविंद्रन आरोग्य विभाग संचालक डॉ नितीन अंबाडेकर, डॉ विजय कंदेवाड यांच्या हस्ते सन्मानचिह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्विकारताना सोबत नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांचा गौरव करण्यात आला. 

या बाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता जिल्हा मध्ये आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहचली पाहिजे या साठी मी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, लातूर आरोग्य उपसंचालक डॉ रेखा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील माझी आरोग्य सेवा मधील जिल्हा स्तरावरून गाव पातळीवरील सर्व यंत्रणा यांच्या सहकार्याने मी काम करुन जिल्हाला अनेक पुरस्कार या वर्षी सुध्दा यांच्यामुळे मिळाले असल्याचे प्रतिपादन केले आहे. या मुळे जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ संगिता देशमुख यांच्यामुळे जिल्हा राज्यात आरोग्याच्या विविध योजना व आरोग्य सेवा देण्यामध्ये अव्वल स्थानावर नेला आहे या बद्दल त्याच्या कामाचे कौतुक अनेक पदाधिकारी व अधिकारी याचा कडून होत आहे.

१६ नोव्हेंबर २०२५

भाजप पक्षाच्या हितासाठी व शहराच्या विकासासाठी माजी.नगराध्यक्ष डाॅ.कुडमूलवार व बेजगमवार एकत्र



कुंडलवाडी प्रतिनिधी

कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी नगरपालिका भाजपचे नगराध्यक्ष पदाबाबत अद्याप घोषणा झाली नाही. या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी नगरपालिकेचे भाजपचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव कुडमुलवार,

माजी.नगराध्यक्ष सुनील बेजगमवार हे आज दि.१६ नोव्हेंबर रोजी एकत्र आले आहेत.भारतीय जनता पक्ष आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शहरातील विकास प्रेमी नागरीकांचा ईच्छेमुळे आम्ही दोघे एकत्र आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमुलवार आणि माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी दिली आहे.कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीची सध्या नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची प्रक्रिया सुरू असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे अंतिम तारीख उद्या दि.१७ नोव्हेंबर रोजी आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून अद्याप नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण? याबाबत पक्षश्रेष्ठींकडून नाव जाहीर करण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी शहरात अनेक राजकीय समीकरण घडत असून यातच १६ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक पंढरीसेठ दाचावार यांच्या निवासस्थानी भाजपचे माजी नगराध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमुलवार आणि सुनील बेजगमवार हे दोघे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले. यावेळी अनेक बाबींवर एक मत होऊन विविध विषयांवर चर्चा झाली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आगामी काळातील निवडणुकीत पक्ष हित राखून तसेच शहराच्या जनमताचा कौल चा आदर करून दोघेही एकत्र आल्याची प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष डॉ विठ्ठल कुडमुलवार व माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी दिली आहे. भाजपमधील अंतर्गत गट संपुष्टात होऊन एकत्र आल्याने आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झाला आहे.यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक पंढरीनाथ नगरसेवक, विश्वनाथ दाचावार, माजी नगरसेवक श्रीनिवास जिठ्ठावार, संतोष पाटील शिवशेट्टे, दिनेश दाचावार, हणमंतराव बेजगमवार, माजी नगरसेवक पंढरी पुपलवार,मोहम्मद अफजल आदी जण यावेळी उपस्थित होते.

११ नोव्हेंबर २०२५

पोलिस प्रशासनाचा वतीने निवडणुक अनुषंगाने मोहल्ला कमिटीची बैठक

 



पोलिस प्रशासनाचा वतीने निवडणुक अनुषंगाने मोहल्ला कमिटीची बैठक 

आचार सहितीचे पालन करीत,मतदानाचा हक्क बजावण्याचे आवहान.

कुंडलवाडी प्रतिनिधी

कुंडलवाडी पोलिस प्रशासनाचा वतीने नगर परिषद निवडणुक अनुषंगाने दि.१० नोव्हेंबर सोमवार रात्री ९≈३० ते १०≈३० वाजण्याचा दरम्यान मोहल्ला कमिटीची बैठक शहरातील प्रभाग क्रमांक १ गजानन महाराज मंदीर,

प्रभाग क्रमांक ५ मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.यावेळी मतदार नागरीकांनी आदर्श आचार सहितीचे पालन करीत सामाजिक,जातीय,

धार्मिक सलोखा राखून मतदानाचा हक्क बजावावे असे आवहान करण्यात आले.

यावेळी सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे,पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांचासह प्रभागातील मोठ्याप्रमाणात महिला पुरूष मतदार उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील,सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे यांनी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन करताना बैठकीचे उद्दिष्ट सागण्यात आले.निवडणूक शांततेत निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडणे,कायदा व सुव्यवस्था राखणे,सामाजातील सामाजिक

जातीय,धार्मिक सलोखा राखणे,मतदानाच्या आधी मतदान दरम्यान आणि मतदानाच्या नंतर उद्भवणाऱ्या अनुचित घटना रोखणे,यावेळी

*राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांना सूचना*

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी  पालन करणे,मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन न देणे,प्रचारात लाऊड स्पीकर,बॅनर,सोशल मीडियाच्या वापर कायद्याप्रमाणे तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमाप्रमाणे करणे,कोणत्याही धार्मिक स्थळावरून प्रचार करू नये,कोणीही सोशल मीडियावर खोटी माहिती,अपप्रचार करणारे माहिती शेअर करणार नाही याची काळजी घेणे,

सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी तसेच पॅनलने परस्परांचा आदर राखावा भांडण किंवा वाद करू नये,मतदारांना शांततेत आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,उमेदवारांनी एकमेकांच्या कामावर टीका करावी वैयक्तिक टीका करू नये,मतभेद असले तरी वैरभाव नसावा,निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्या साठी पोलीस विभाग तयार आहे मात्र जनतेचे आणि सर्व राजकीय पक्ष आणि गटाचे सहकार्य मिळाले तरच ही जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.

*सोशल मीडिया वापराबाबत सूचना*

आचारसंहिता लागल्यानंतर कोणीही वादग्रस्त, खोटी माहिती,पोस्ट फॉरवर्ड करू नये.

कोणत्याही उमेदवाराचा, पक्षाचा प्रचार किंवा विरोध करणारे संदेश पोस्ट,व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने शेअर  किंवा फॉरवर्ड करू नये.निवडणूक निकालावर परिणाम, दिशाभूल किंवा अफवा पसरवणारी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करू नये.निवडणूक आयोग ,जिल्हाधिकारी किंवा अधिकृत सरकारी हँडल्स कडून मिळालेली माहितीच खात्री करून शेअर करावी.मतदार यादी,मतदान तारीख,मतदान केंद्र यासारखी माहिती अधिकृत वेबसाईट वरून तपासून प्रसारित करावी.आपले वैयक्तिक मत व्यक्त करताना संविधानिक मर्यादा व सभ्य भाषेचा वापर करावा.धार्मिक,जातीय,भाषिक किंवा प्रादेशिक भावना भडकवणारे विधान टाळावे.मतदान केंद्र,मतदान यंत्र,मतदारांच्या रांगा किंवा मतदान प्रक्रिया यांचे फोटो तसेच व्हिडिओ नियमांच्या अधीन राहून शेअर करावे.मतदान गुप्तता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.अफवा,चुकीची माहिती,बनावट बातम्या शेअर किंवा फॉरवर्ड करू नये.

मतदानाच्या 48 तास अगोदर मतदानादरम्यान आणि त्यानंतर घ्यावयाची काळजी

मतदानाच्या 48 तासापूर्वी कोणीही उमेदवाराचा किंवा पक्षाचा प्रचार,सभाचे आयोजन,भेटीगाठी, सोशल मीडिया पोस्ट,व्हिडिओ किंवा प्रतिक्रिया कोणीही देणार नाही.सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ हे लाईक शेअर कमेंट फॉरवर्ड आधी माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार करणे टाळावे.सोशल मीडिया वापरताना संयम बाळगावा राजकीय चर्चा विनोद मीन्स टीका किंवा प्रचारात्मक साहित्य पोस्ट करू नये.मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात 200 मीटर अंतरावर प्रचारात्मक कृतीस मनाई आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.निकाल जाहीर होईपर्यंत कोणतीही कृती अफवा अंदाज किंवा निकाला संबंधी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये.मतदानाच्या दिवशी  पेंडॉलवर राजकीय पक्षाचा झेंडा बॅनर लावू नये.प्रचार संपताच सर्व बॅनर झेंडे काढून घ्यावेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच शहरातील प्रत्येक वार्डनिहाय तसेच प्रभाग निहाय मोहल्ला कमिटीच्या बैठका यापुढे ही प्रशासनाच्या वतीने पार पडणार आहेत.असे पण सांगण्यात आले.

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...