१८ मे २०२०

"आत्मनिर्भर" दिलासा पँकेजमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी राहुल साळवे यांची पंतप्रधानांकडे मागणी



जिल्हा प्रतिनिधी :- सध्या कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाँकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे या लाँकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक टंचाई आणि ऊपासमारी यावर ऊपाययोजणा करत केंद्र सरकार कडुन या 56 दिवसात 20.97 लाख करोड रूपयांची दिलासा पँकेज दिले असल्याचे तसेच यातील 11 लाख करोड रूपयांची घोषणा या 5 दिवसात 5 प्रेस काँन्फरंन्स घेऊन केंद्रिय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे यामध्ये एकुण 51 घोषणा करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी 11.02 लाख करोड रूपयांची घोषणा करण्यात आली आहे तसेच 22 मार्च ते 22 में पर्यंत केंद्र सरकारच्या विविध घोषणांमध्ये 1.92 लाख करोड रूपयांची घोषणा झाली त्यात आरबीआयचे महत्वाचे पाऊल म्हणुन 8 लाख करोड रूपये एवढे असुन अशा प्रकारे एकुण 20.97 लाख करोड रूपयाच्या "आत्मनिर्भर" भारत दिलासा पँकेजची घोषणा करण्यात आली आहे परंतु या घोषणांमध्ये ज्यांना आत्मनिर्भर बनण्याची खरी गरज आहे ते दिव्यांग,निराधार आणि जेष्ठ नागरिक यांच्यासाठी कुठल्याच अतिरिक्त निधीची तरतुद केली नसल्यामुळे तसेच याआधी वित्तमंत्री निर्मला सीतारमन यानींच प्रधानमंत्री गरीब कल्याण धन योजनेतुन  शेकडो दिव्यांग निराधारांना अतिरिक्त एक हजार रुपये याप्रमाने तीन महिण्याकरीता वाढिव निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती परंतु नांदेड जिल्ह्यातील एकाही दिव्यांगांला या वाढिव अतिरिक्त निधीचा लाभ भेटला नसल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी

 देशाचे पंतप्रधान मा.नरेंन्द्र मोदी यांना एका ई-मेलद्वारे कळविले आहे आणि त्या निवेदनात असे म्हटले आहे की,केंद्राकडुन सादर करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत दिलासा पँकेजमध्ये दिव्यांग निराधारांना डावळण्यात आले आहे जे कि आज आत्मनिर्भर बनण्याची खरी गरज आहे ती दिव्यांग निराधार आणि जेष्ठ नागरिक यांनाच आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदि यांनी काहितरी आधार देत या पँकेजमध्ये स्वतंत्र निधीची तरतुद करावी असे राहुल साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

1 टिप्पणी:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...