०६ डिसेंबर २०१८

बाबरी मस्जीद पाडणार्या दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्या

  देगलूर  ६ डिसेंबर १९९२ रोजी स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे समाजकंटकांकडुन पवित्र स्थळ बाबरी मस्जीद पाडण्यात आली.देगलूर शहरातील सर्व मुस्लीम बांधवांकडुन या दुर्दैवी घटनेचा निषेध करून या मागील समाजकंटकांना तात्काळ शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी देगलूर मार्फत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनास देण्यात आले.निवेदन देतांना तन्जीम आईमा मस्जीद या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती अहेमद खासमी,मौलाना हनिफ,हाफीज अय्युब ,हाफीज अकबर ,हाफीज जिलानी,मोहमद अल्ताफ पत्रकार, इब्राहीम खाँन,शोऐब शहापुरकर ,हमीद शहापुरकर ,लियाकत अली,शेख इम्रान ,फायख खुरेशी ,जावेद अहेमद व इतर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...