बिलोली - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा सावळी येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे कि.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने प्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली.तदनंतर तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी उपस्थित सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्यामध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे, हे त्यांनी सांगितले आहे. डॉ.कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जात आहे.
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. वाचनामुळे होणारे फायदे, अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो, विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो हेच नेमके या उपक्रमातून साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच शाळा महाविद्यालयापर्यंत हा उपक्रम सिमित न ठेवता आपण सर्वांनी वाचले पाहिजे, असे मला वाटते. 'वाचाल तर वाचाल' असे म्हटले जाते. आजच्या 21 व्या शतकातही हे आपल्याला तंतोतंत पटणारे आहे. आजचा शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना टी.व्ही, स्मार्ट फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर यापासून बाजूला करुन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. हा दिवस त्या दिना पुरता मर्यादीत न राहता नेहमीच पुस्तक, मासिक, साहित्य यांचे वाचन व्हावे ही आपली प्रामाणिक भावना आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भेट योजनाही या दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात यावी, असे आवाहन मी केले आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या शाळेला किंवा ग्रंथालयाला पुस्तक भेट देऊ शकेल. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करावा, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करावी, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, प्रत्येक शिक्षकाने ऑक्टोबर अखेरपर्यंत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या किमान एका पुस्तकाचे वाचन करावे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबवला जावा, असे सविस्तर मार्गदर्शन करून समतादूत यांच्या तर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका आर.बी.सय्यद यांना पुस्तक भेट देण्यात.
सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टीचे महासंचालक मा.कैलास कणसे व मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करत आहेत . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक कोलवाड यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका आर.बी.सय्यद यांनी मानले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा