मुख्य सामग्रीवर वगळा

माता रमाबाईंच्या त्यागामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडू शकले- डॉ. दिलीप पुंडे



बेटमोगरा येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचा १२२ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा.

मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.७ फेब्रुवारी २०२० रोजी रमाई जन्मोत्सव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी ठिक ९:०० वा पंचशील धम्म ध्वजारोहण आयु.लालिताबई सोनकांबळे व दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णकृती प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली."
मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था गेली ६ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी सामाजिक क्षेत्रात, कधी वयोवृद्ध व्यक्तीसाठी मायेचा हात देत मोफत नेत्र तपासणी, विविध प्रकारची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,व्याख्यानमाला व समाज प्रबोधनपर कार्यक्रम अशा विविध प्रकारचे सामाजिक कार्य या रमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे.

या मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दत्ता सोनकांबळे व सचिव
भारत सोनकांबळे सह भगवान सोनकांबळे,आयु.
सगरबाई दत्ता सोनकांबळे,आयु.महादाबाई कांबळे, चंद्रकांत कांबळे, जयश्री ज्ञानेश्वर सोनकांबळे  यांच्या माध्यमातून दरवर्षी  ७ फेब्रुवारी रोजी महामाता,त्यागमुर्ती, विश्वरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी होते याहीवर्षी माता रमाबाईंच्या १२२ व्या जन्मोत्सवा निमित्त दि.७ फेब्रुवारी २०२० रोज शुक्रवारी संस्थेचे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या संयोजनातून बेटमोगरा येथील धम्मशील बुद्धविहार येथे रमाई जन्मोत्सव व  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
व्यक्तींचा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पुरस्काराचे मानकरी मुखेड तालुक्यात वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे,मराठवाडा भूषण तथा मुखेड भूषण सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ. दिलीपराव पुंडे व मुखेड तालुक्यासह सबंध नांदेड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात व आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे मा. दशरथराव लोहबंदे,तसेच मुखेड तालुक्यात आंबेडकरी चळवळीला गीत गायनाच्या रूपात जीवंत ठेवत उल्लेखनीय कार्य करणारे गायक तेजेराव भद्रे सह तालुक्यात पशू वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणारे डॉ.राहुल कांबळे इत्यादींना यावर्षीचा रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने संस्थेचे सचिव भारत सोनकांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सन्मान चिन्ह व रमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील साऊली,देशातील बहुजनांची माऊली,म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी माता रमाबाई भीमराव आंबेडकर.
रमाई म्हणजे भारतभूमीच्या उदारातील कोहिनूर हिरा घडवणारी कस्तुरी आपल्या आयुष्यभराच्या त्यागाने अन् श्रमाने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्याला रमाबाई चे अतिशय महत्वाचे योगदान लाभले आहे.
 "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची महत्वाची भूमिका" या उक्तीप्रमाणे यावर्षीचा प्रदान करण्यात येणारा पुरस्कार हा सपत्नीक देण्यात आला.
‌कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मा.चिनू पाटील होते तर उद्घाटन डॉ.वीरभद्र हिमगिरे व बळवंतराव पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ठिक ६:०० वा.महापुरुषांच्या प्रतिमांना दीप,धूप व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
‌ यावेळी मराठवाडा भूषण डॉ.दिलीप पुंडे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करीत माता रमाबाईंच्या त्यागामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर घडू शकले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले म्हणून भारतीय संविधान निर्माण झाले,आणि संविधान निर्माण झाल्यामुळेच डॉ.पुंडे निर्माण झाले व हजारो सर्पदंश रुग्णांना जीवदान मिळाले, संविधान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बहुजनांच्या कल्याणचा जाहीरनामा आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.
आजच्या रमाई पुरस्काराचे मानकरी डॉ.राहुल कांबळे व तेजेराव भद्रे सह डॉ. वीरभद्र हिमगिरे,बळवंतराव पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
रमाई फाऊंडेशनच्या वतीने संस्थेचे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यांच्यावतीने भोजनदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे तिसरे सत्र रात्री ९:०० वा.मुखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. भाऊसाहेब मगरे यांच्या हस्ते उद्घाटना नंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे आणि संच यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख
उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, सिद्धार्थ कांबळे बेळीकर,मा.चिनू पाटील, ग्रा.पं.सदस्या
ललिताबाई मालू सोनकांबळे, दीपक सोनकांबळे,दत्तात्रय पाटील,खुशालराव पाटील,धनराज पाटील,भानुदास पाटील,पत्रकार दत्तात्रय कांबळे, आयु.गंगाधर सोंडारे,पत्रकार भास्कर भेदेकर,धम्मनंद भेदेकर, महेताबभाई शेख,अजीम शेख, दै.साहित्य सम्राट चे संदीप कांबळे,संपादक नामदेव
यलकटवार,मुस्तफा पिंजारी, निवृत्ती पोटफोडे,प्रल्हाद सोनकांबळे,दिलीप सोनकांबळे,शंकर सोनकांबळे, राहुल सोनकांबळे,हर्षदीप सोनकांबळे, आनंदा सोनकांबळे, गोविंद सोनकांबळे,सागरबाई सोनकांबळे,शांताबाई सोनकांबळे,ज्योतीबाई सोनकांबळे,शीलाबाई सोनकांबळे,मंगलबाई सोनकांबळे, अनिता सोनकांबळे, अंजनाबाई सोनकांबळे, निकिता सोनकांबळे,जयश्री सोनकांबळे, शेवंताबाई कांबळे,कु.शितल कांबळे,मालू सोनकांबळे, कु.नव्या सोनकांबळे,संविधान सोनकांबळे, कु.करुणा सोनकांबळे,धम्मशिला बकरे, यशवंत सोनकांबळे, दयानंद सोनकांबळे,विनोद बकरे,नागेश सोनकांबळे,संघर्ष सोनकांबळे, इत्यादींसह हजारोंच्या संख्येने महिला,पुरुष व युवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचलन संस्थेचे सचिव भारत सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्यंकट सोनकांबळे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ

संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....!    बालाजी बच्चेवार       नायगाव विधानसभा    गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव  उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!!   मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी  स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...

नोंदणीची 27 मे अंतिम मुदत ; खरीप हंगामासाठी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- खरीप हंगाम सन 2020-21 साठी पीक कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील नमूद संकेतस्थळावर पीक कर्जाची मागणी नोंदणी ही 17 ते 27 मे 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणीद्वारे करावी. शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जागतिक महामारी कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन2020-21 या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link  ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 या दरम्यान करावी. ही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुस...

नायगाव विधानसभेवर सदाभाऊ खोत यांचा दावा

         पावसाळी अधिवेशनेच्या शेवटच्या दिवशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे माध्यमाशी चर्चा करताना सांगितले की,भाजपाकडे विधानसभेच्या १० जागेची मागणी रयत क्रांती संघटनेसाठी केली आहे.    सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे भाजपाचा मित्र पक्ष आहे.भाजपा -शिवसेना मित्र पक्षाला १८ जागा सोडणार आहे त्यात सदाभाऊ खोत यांनी १० जागेची मागणी केली. इस्लामपूर,शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर,माण, कोरेगाव, फलटण,नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ,उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अशा १० मतदारसंघावर दावा केला आहे.    नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा हा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे कार्यक्षेत्र असणारा विधानसभा मतदारसंघ आहे.     पांडुरंग शिंदे हे अनेक वर्षांपासून सदाभाऊ खोत यांच्या सोबत चळवळीत कार्य करत आहेत.  पांडुरंग शिंदे हे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रवक्ते,राज्य संघटक असे अनके आणि आता युवा प्रदेशाध्यक्ष अश्या महत्त्वाचे पदावर काम कर...

आदमपुरच्या संदीप भुरेंनी दिलं मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संगीत..

बिलोली:-तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी युवा संगीतकारांनी प्रा. संदीप भुरे आदमपुरकर, यांनी आपले पाऊल आल्बमपासूनचे आता चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आहे  जिद्द,  चिकाटी,परीस्थितीशी संघर्ष करुन यशस्वी चित्रपटाकडे वाटचाल होत ,.. नांदेड येथील निर्माता , दिग्दर्शक प्रा.अशोककुमार दवणे यांनी "बाबासाहेबाचि आई भीमाई".,ह्या मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संदीप यांना संधी देण्यात आली .त्या संधीचं सोनं मात्र नक्की केलं आहे.. भीमाई चित्रपटाची गाणी ध्वनीमुद्रीत झाली आहेत ह्या चित्रपटात सिनेगायक  सुरेश वाडकर मुंबई , सिनेगायिका नेहा राजपाल मुंबई व इजि.कु. दक्षता दवणे आदी गायकांनी गायले आहे.... ह्या चित्रपटाचे पोस्टर ही लान्च झाले आहे.गाणी नादमधुर आहेत " आजिवासन "रेकार्डींग स्टुडीओ सांताक्रूझ मुंबई येथे पार पडले... साऊंड रेकॉर्डींस्ट प्रकाश माने मुंबई संगीत:-संदीप भूरे यांच लाभलं आहे.           या यशाबद्दल प्राचार्य मारोती पिन्नरवार सर गुरुवर्य प्रा.बाबूराव उपलवार,पी.पी.गायकवाड , जाफर आदमपूरकर, काशिनाथ वाघमारे , मारोती भुसावळे , दिलिप भसावळे , डॉ.विलासराज भद्...

बिलोली तालुक्यातील केरूर येथील एकास कोरोनाची लागण

न.प येथे स्थापन केलेल्या सी.सी.सी केंद्रात उपचार सुरू  .... बसवंत मुंडकर बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथुन जवळच असलेल्या केरूर येथील एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पाँझीटिव्ह आला आहे.सदर रूग्णावर बिलोली नगर परिषदेच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दोन महिन्याच्या अवधिनंतर तालुक्यात कोरोनाचा पाँझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे.प्रशासनाच्या वतीने सयंम बाळगण्याचे अवाहन करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी हैद्राबादहून नांदेड येथे आलेल्या एका व्यक्तीने नांदेड येथील लंगर परिसरात काही काळ व्यथित केला.त्यानंतर नांदेड हून नरसी पर्यंत तीनचाकी अँटोने व नरसी हून बिलोली पर्यंत ट्रक ने प्रवास केलेल्या सदर व्यक्तीस कोरोना सदृष लक्षणे आढळून आल्याने सदर रूग्णास बिलोलीच्या सी.सी.सी केंद्रात दाखल करून त्याची चाचणी करण्यात आली.प्रथम घेण्यात आलेल्या चाचणीत सदर रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता.माञ लंगर परिसरातील काही व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्याने व आपणासही तशीच लक्षणे दिसत असल्यामुळे त्या रूग्णाने स्वतच पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती.रूग्णाच्...

संदीप भुरे यांच्या गीताचे सिनेतारका वर्षा उसगांवकर हस्ते मंगळवेढा येथे विमोचन....

नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर यांच्या 'हे लंबोदरा तू आल्यांवर' या गणपती गीताचे ख्यातनाम सिनेतारका वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते 'दामाजी एक्स्प्रेस' मंगळवेढा येथे विमोचन करण्यात आले. या गीताचे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार विशाल पाटील, सह दिग्दर्शक अमोल वाघमारे, ध्वनिमुद्रक प्रकाश माने (मुंबई) व हिंदी टिञपटाचे संगीतकार प्रशांत सिंग(मुंबई)यांचे या गीताला संगीत संयोजन लाभले आहे. गायक सिद्धार्थ गजघाटे यांनी गायिले आहे. 'हे लंबोदरा तू आल्यांवर' हे गणपती गीत सर्व रसिक मिञांना नक्की आवडेल. याबद्दल माजी उपसरपंच व पञकार काशिनाथ वाघमारे, कवी,गीतकार जाफर  आदमपूरकर, पञकार रियाज शेख, रमाकांत महाराज, सुरेश जाधव, संजय जाधव, दिलीप भुरे, गोपाळ म्हेञे, प्रा. बाबुराव उप्पलवार, प्राचार्य मारोती पिन्नरवार, प्रा. खुशाल उप्पलवार, प्रा. सुनिल भुरे, महायान सावळे, आदिंनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

कुंडलवाडीत पुन्हा एक कोरोना पाॅझिटीव्ह

  कुंडलवाडी मो.अफजल दि.12 ऑगस्ट रोजी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळले त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले. कुंडलवाडी शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी यांना गेल्या दोन तीन दिवसापासून अशक्तपणा सर्दी,ताप अदी जानवत असल्याने ते स्वता अॅटिजन रॅपिड टेस्ट करून घेतले असता अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे उद्या तपासणी करण्यात येणार असे पण डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.

का रं देवा मराठी चित्रपटास संदीप भुरेचं संगीत

  नांदेड-   का रं देवा  ह्या मराठी चित्रपटातील   चार गाणी असुन मुंबई  येथे  नुकतेच ध्वनीमुद्रण झाले आहे   निर्माता प्रशांत शिंगटे   दिग्दर्शक रणजीत जाधव ,संगीत संदीप भुरे ,गायक - महागायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे ,डॉ नेहा राजपाल, मधुर शिंदे ,सुप्रिया सोरटे प्रोग्रामर प्रशांतसिंग रेकॉर्डिस्ट प्रकाश माने हे आहेत

बिलोली पंचायत समिती पोट निवडणूकीत भाजपाचे वर्चस्व कायम

बिलोली तालूक्यातील अटकळी गणातून भाजपचे उमेदवार सौ.अर्चना मारोती शट्टीवार १५५५ मताने विजयी झाले असून कॉग्रेसचे पोटनिवडनूकीत सूध्दा हार झाली आहे. अटकळी गणा मध्ये कु.भाग्यश्री अनपलवार यांची शासकीय सेवेत नियूक्ती झाल्याने त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने अटकळी गणातील पंचायत समिती सदस्य पद रिक्त होते . सदरिल रिक्त असलेली जागा पंचायत समाती सदस्या साठी पोट निवाडणूकीचे मतदान काल २३ जून २०१९ रोजी घेण्यात आले होते तर आज सकाळी निकाल घोशीत करण्यात आले. कॉग्रेस उमेदवाराला  २७८८ मते मिळाले व भाजप चे उमेदवार सौ .अर्चना मारोती शेट्टी यांना ४३४३ मते मिळाली असून १५५५ मतांनी निवडून आल्याचे निवडणूक विभागाकडून घोशीत करण्यात आले . तालूक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी सौ शट्टीवार यांचे विजयी मिरवणूक वाजत गाजत फटाक्याच्या अतिष बाजीने काढण्यात आले. यावेळी  बाळासाहेब, पाटील यादवराजी तूडमे , रवि पाटील खतगावकर , निरंजन पाटील  खतगावकर ,अनंदपाटील बिराजदार .बाबाराव रोकडे, दत्ताराम बोधने, उमाकांत गोपछडे, गंगाधर अनपलवार, इंद्रजीत तूडमे, श्रीनिवास पाटील, सय्यद रियाज ,बळवंत पाटील लूटे , लालू ...

देगलूर- बिलोली विधानसभेत कॉग्रेस कडून जगदिश कदमचा नवा चेहरा?

बिलोली (सय्यद रियाज)  लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या काही दिवसात या निवडणुका होऊ घातल्या आहेत.  देगलूर - बिलोली  विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक कॉग्रेसचे जगदिश कदम यांनी दाखवली आहे .  विधानसभेची उमेदवाराकडून तयारी चालू आहे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघा मध्ये कॉग्रेस कडून अनेकांक ईच्छूककांनी मुलाखती दिल्या , तर नायगाव तालूक्यातील , पिंपळगाव येथील यूवा उमेदवार कॉग्रेसचे कार्यकर्ते व  माजी मुख्यमंञी अशोक चव्हान यांचे कट्टर समर्थक म्हणुन परिचित आहेत  यांनी विधानसभेत मोर्चे बांधानीला जोरदार तयारी चालू केली. गेल्या अनेक वर्षा पासून समाजकार्य राजकारणात सक्रिय आहे ते समाज कार्यकरत आहे. 1999 पासून कॉग्रेस  पक्षाच्या माध्यमातून कार्यकरत आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणून लढवण्यास तयार असल्याचे मराठी लाईव्ह न्यूज शी बोलतांना सांगितले.