१३ सप्टेंबर २०२०

कुंडलवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास नजीर पठाण यांच्या वतीने रुग्णालयास 10 गादी भेट

 
कुंडलवाडी (मोहम्मदअफजल)
कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी
शहरातील शतरंजीगल्ली राहणारे जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण यांच्यावर योग्य उपाचार करून चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देवून त्यांचे आरोग्य आबाधीत ठेवले याबद्दल जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण  यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णांचा सेवेत 10 गादी भेट म्हणून दिले.त्याबद्दल डाॅ.बालाजी सातमवाड यानी नजीर पठाण यांचे आभार मानले.
यावेळी डाॅ.तानाजी सुर्यवंशी,पत्रकार मोहम्मद अफजल,शेख शमशोदीन,शिवमनी नागुलवार,
इसाक मौलाना पठाण,मुलगा जलील नजीर पठाण अदी उपस्थित होते. 
याबाबत माहिती अशी की शहरातील शतरंजीगल्ली राहणारे जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण  यांच्या  डाव्यापायास दुचाकीने दुखापत होवून मोठ्या प्रमाणात जख्म झाले होते.त्या पायास मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होवून सुज आले व त्यांचे आरोग्य दिवसे दिवस खालावत चालले असे.या कोरोनाचा काळा या छोट्याशा जख्मेने एवडे मोठे रूप धारण केले.अता मी वाचणार की नाही अशी त्या रूग्णाची समज झाली होती.
नांदेड येथे उपचार घेतले तर मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होईल व आरोग्य सुधरेल की नाही ते दुविधा मनस्थित होते.यात ते प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व सर्व हकीकत वैद्यकीय अधिकारी डाॅ.सातमवाड यांना सागीतले गेल्या एक महिन्या पासून त्यांचावर उपचार आहे. आता त्यांची तबीयत 90% सुधरली त्यांना समाधान वाटत आहे. डाॅ.सातमवाड साहेब योग्य उपाचार करून चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा दिले म्हणून मी वाचलो.माझे आरोग्य आबाधीत आहे.असे रूग्ण जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण यांनी बोलून दाखवीले.म्हणून त्यांनी स्वखुशीने आरोग्य केंद्रास यापुर्वी स्लाईन बॅक्स निडल्स भेट दिले होते.त्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नजीर पठाण यांच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी रूग्णांचा सेवेत 10 गादी भेट म्हणून देण्यात आले आहे.याबद्दल वैद्यकीय अधिकारी  डाॅ.सातमवाड नजीर पठाण यांचे आभार मानले.त्यांच्या दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...