११ एप्रिल २०२०

१५ एप्रिल पासून मोफत रेशन वाटपाची सुरुवात-आपल्या हक्काचे रेशन घेण्याचे आव्हान- शेख शादुलभाई



कंधार -

सम्पूर्ण जग भरात वैश्विक महामारी Covid-१९ ने थैमान घातले असून या आजाराशी लढण्यासाठी जगभरात सतत प्रयत्न चालू असून शासन प्रशासन आप आपल्या स्तरावर काम करीत आहेत..तसेच लॉक डाउन च्या अवघड परिस्तिथ गोर गरीब परिवाराला एक वेळेचे अन्न मिळणे अवघड झाले असून त्यांच्यावर उपसामारीची वेळ आली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने Novel Corona Virus (Covid-१९) प्रादुर्भवाच्या पावर्षभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राज्यातील लाभार्त्यांसाठी माहे एप्रिल ते जून या तीन महिन्याचे रेशन अगदी मोफत देण्याचे निर्णय घेतले असून यात अंत्योदय या कार्डधारकासाठी २३ किलो गेहूं आणि १२ किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्त्याना प्रति व्यक्ती ३ किलो गेहूं आणि २ किलो तांदूळ असे ५ किलो धान्य देने अपेक्षित आहे. जर एका लाभार्त्याच्या घरात जर १० सदस्य असतील तर त्यांना ५० किलो तांदूळ मिळालाय पाहिजे आणि हे धान्य दोन टप्यात दिले जाईल एप्रिल महिन्याच्या १ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंत शुल्क आकारण्यात येतील व प्रधानमंत्री योजनेचे धान्य १५ एप्रिल पासून दर महिना अगदी मोफत देण्यात येत आहे
.तसेच कंधार तालुक्यात अनेक ठिकाणी लाभार्त्याना घेतलेल्या धान्याच्या पावत्याही दिल्या जात नाही अशी तक्रार वारंवार येत असून कार्डधारकांनी रेशन दुकानदारांची तक्रार mahafood.gov.in  किंवा aepds या महाराष्ट्र शासनाची वेबसाईटवर करावी तसेच कुठलेही स्वस्त धान्य दुकानात राशन देण्यास टाळाटाळ किंवा कमी देत असतील तर महाराष्ट्राची वेबसाईट किंवा तहसीलदार यांना तक्रार करावी असे आव्हान समाजसेवक पत्रकार शेख शादुलभाई  यांनी केले आहे व तसेच रेशन घेण्यासाठी लाभार्त्यांनी गर्दी करू नये कमीत कमी ३ फिट अंतर करून थांबावे असे ही त्यांनी सांगितले आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...