मुख्य सामग्रीवर वगळा

दिव्यांगांच्या राखीव निधी खर्चाबाबत गत चार वर्षापासुन तीनतेरा"तुटपुंज्या निधीतुनच दिव्यांगांना केला जात आहे बटवारा" :- राहुल साळवे



"दिव्यांग निधी खर्चाबाबत जिल्हा तथा तालुका स्तरावरील समीती हि कागदावरच" पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी  स्विकारतील का जिल्हाभरातील दिव्यांगांचे पालकत्व ?

नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि 30 :- सध्या लाँकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांवर आर्थिक संकटाचा सामना करत ऊपासमारीची वेळ आल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हास्तर आणि मंत्रालय स्तरावर तक्रारी करून पाठपुरावा केला तसेच या संदर्भात बर्याचश्या वर्तमानपत्रात हि बातमी प्रकाशीत झाली आणि त्यातुन थोडेफार का होईना जिल्हा आणि तालुका प्रशासन जागे झाले ?आणि आप आपल्या स्तरावरून बेरोजगार दिव्यांगांना विविध स्वरूपात मदत कार्य करण्यास सुरू केले यावर समाधान व्यक्त करता येणार नाही असे राहुल साळवे यांनी म्हटले आहे कारण दिव्यांगांना '"भिक नको हक्क हवा,सहानुभूती नको विश्वास हवा"'असे म्हणत साळवे यांनी आजवर केलेल्या विविध आंदोलणे.ऊपोषणे.आमरण ऊपोषणे तसेच विविध मोर्चे काढून हि आपल्याला आज लाँकडाऊन काळात आमदार, खासदार, पालकमंत्री यांसह संबंधीत सर्व जिल्हा प्रशासकिय अधिकार्यांना ऊपासमारीची वेळ आलेल्या नांदेड शहर आणि  संपूर्ण जिल्हाभरातील दिव्यांगांसाठी का भिक मागावे लागत आहे याचा संताप आनत संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी खर्चाबाबत आढावा घेतला तसेच विविध शासन निर्णय डाऊनलोड करून त्याचा अभ्यास केला असता भुकंपापेक्षा हि मोठा असा धक्का राहुल साळवे यांना बसला कारण बेरोजगार दिव्यांगांच्या न्याय हककासाठी कोणीच वाली नसल्याचे जानवले तसेच कुंपनच शेत खात असल्याचे कळाले कारण एकिकडे शासन स्तरावरून राज्यातील स्थानिक संस्थांच्या स्वऊत्पनाच्या राखीव निधी दिव्यांग कल्याणार्थ खर्च करतांना कोणत्या योजणा प्राधान्याने हाती घ्याव्यात याविषयी शासनास शिफारस करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय क्रमांक : अपंग (दिव्यांग) - 2017 दि :- 18 में 2017 रोजी एक समीती घटित करण्यात आली या समीतीचा अध्यक्ष - विभागीय आयुक्त, पुणे,सदस्य सचिव - अपंग (दिव्यांग) कल्याण आयुक्त, पुणे.दोन सदस्य - 1) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे आणि 2) अपंग (दिव्यांग) व्यक्तींच्या संघटणेचा एक प्रतिनिधी.शेवटचे तीन निमंत्रित सदस्य :- 1) मा.विधानसभा/विधान परिषददोन सदस्य,2) जिल्हा परिषद अध्यक्ष, पुणे आणि 3) विषयाशी संबंधीत तज्ञ/विद्यापीठ प्राध्यापक.या समीतीला बैठका घेऊन तीन महिन्यात शासनास शिफारशी सादर करण्याबाबत सुचविले होते आणि हि समीती महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासन निर्णय काढून गठित केली होती या समीतीने नेमक्या कोणत्या शिफारशी शासनास सादर केल्या हे मात्र गुलदस्त्यातच आहे शासन ईथेच थांबले नाही तर शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडुन नि:समर्थ व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या 3 टक्के आताचे सुधारित 5 टक्के निधीचे नियंत्रण करणेकरीता जिल्हा व तालुका स्तरावर सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग,शासन निर्णय क्रमांक :- अपंग (दिव्यांग) -2015/प्र.क्रं.2 दि :- 18 नोव्हेंबर 2015 रोजी एकुण 7 जनांणी समीती गठित करण्यात आली होती या समीतीचा अध्यक्ष :- पालकमंत्री, सदस्य सचिव - जिल्हाधिकारी आणि पाच सदस्य ज्यात 1) आयुक्त, महानगरपालिका 2) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. 3) जिल्हा नियोजन अधिकारी, 4) मुख्याधिकारी,नगरपरीषद/नगरपालिका आणि 5) सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण. यांचा समावेश आहे एवढे सारे असतांना जिल्हा परिषद नांदेड कडुन सन 2015-16 च्या निधीसाठी एकुण 697 लाभार्थी पात्र ठरवले होते तेहि 2017 मध्ये आणि त्या पात्र दिव्यांगांच्या खात्यावर निधी जमा करता करता जिल्हा परिषदेला 2019 च ऊजडले आणि त्यानंतर नवीन लाभार्थ्यांसाठी जिल्हाभरातील सर्व पंचायत समीत्या मार्फत शेकडो दिव्यांगांकडुन 2018 ला 2019 ला अर्ज मागवुन घेतले परंतु अद्याप कुणाला एक खडकु हि निधी वितरीत केला नाही मग 2016-17, 2017-18,2018-19,2019-20 आणि आताचा हा 2020-21चा दिव्यांगांचा राखीव निधी गेला तरी कुठे ? असाच काहिसा प्रकार महानगरपालिका नांदेडकडुन हि झाला 2015-16 च्या निधी खर्चासाठी मनपा हद्दितील शेकडो दिव्यांगांकडुन अर्ज मागविण्यात आले आणि प्रत्यक्षात त्याचे वितरण 2017 मध्ये करण्यात आले काही दिव्यांगांचे आयएफसी कोड आणि आकाउंट नंबरची अडचण आल्यामुळे त्यांना टप्याटप्याने निधी वितरीत करण्यात आला त्यातील काही पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावर आता या लाँकडाऊ काळात निधी वर्ग करण्यात आला.परंतु महत्वाचा प्रश्न हे आहे की,2015-16 नंतरचा 2016-17, 2017-18, 2018 - 19, 2019 - 20 आणि 2020 - 21 चा दिव्यांगांचा राखीव निधी गेला तरी कुठे ? हा निधी शासन निर्णयाप्रमाणे एकुण 18 प्रयोजणार्थ बाबींवर का पुर्णत: खर्च केला जात नाही शासन तर एकीकडे म्हणते कि हा निधी त्याच त्या वर्षी पुर्णत:खर्च करणे बंधनकारक आहे मग असे का घडते असाच काही प्रकार सर्व तालुक्यातील नगरपंचायती/नगरपरीषदा/नगरपालिका आणि पंचायत समित्या ग्रामपंचायतीकडुन हि घडत आहे अंदाजीतच रक्कम ग्राह्य धरून वितरीत केले जात असल्याचे राहुल साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे तसेच साळवे पुढे म्हणाले कि कोणीहि दिव्यांगांप्रती कुठलेच राजकारण करू नये तसेण आपल्या अधिकाराचा हि गैरवापर करू नये एक माणवतेचे प्रतिक म्हणुन जन्मताच निसर्गाने शरीराच्या एखाद्या अवयवयाने अपंगत्व आलेल्या दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत कशा पोहचविता येईल यासाठी प्रयत्न करावे असे राहुल साळवे यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ

संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....!    बालाजी बच्चेवार       नायगाव विधानसभा    गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव  उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!!   मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी  स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...

नोंदणीची 27 मे अंतिम मुदत ; खरीप हंगामासाठी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- खरीप हंगाम सन 2020-21 साठी पीक कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील नमूद संकेतस्थळावर पीक कर्जाची मागणी नोंदणी ही 17 ते 27 मे 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणीद्वारे करावी. शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जागतिक महामारी कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन2020-21 या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link  ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 या दरम्यान करावी. ही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुस...

नायगाव विधानसभेवर सदाभाऊ खोत यांचा दावा

         पावसाळी अधिवेशनेच्या शेवटच्या दिवशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे माध्यमाशी चर्चा करताना सांगितले की,भाजपाकडे विधानसभेच्या १० जागेची मागणी रयत क्रांती संघटनेसाठी केली आहे.    सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे भाजपाचा मित्र पक्ष आहे.भाजपा -शिवसेना मित्र पक्षाला १८ जागा सोडणार आहे त्यात सदाभाऊ खोत यांनी १० जागेची मागणी केली. इस्लामपूर,शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर,माण, कोरेगाव, फलटण,नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ,उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अशा १० मतदारसंघावर दावा केला आहे.    नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा हा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे कार्यक्षेत्र असणारा विधानसभा मतदारसंघ आहे.     पांडुरंग शिंदे हे अनेक वर्षांपासून सदाभाऊ खोत यांच्या सोबत चळवळीत कार्य करत आहेत.  पांडुरंग शिंदे हे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रवक्ते,राज्य संघटक असे अनके आणि आता युवा प्रदेशाध्यक्ष अश्या महत्त्वाचे पदावर काम कर...

आदमपुरच्या संदीप भुरेंनी दिलं मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संगीत..

बिलोली:-तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी युवा संगीतकारांनी प्रा. संदीप भुरे आदमपुरकर, यांनी आपले पाऊल आल्बमपासूनचे आता चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आहे  जिद्द,  चिकाटी,परीस्थितीशी संघर्ष करुन यशस्वी चित्रपटाकडे वाटचाल होत ,.. नांदेड येथील निर्माता , दिग्दर्शक प्रा.अशोककुमार दवणे यांनी "बाबासाहेबाचि आई भीमाई".,ह्या मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संदीप यांना संधी देण्यात आली .त्या संधीचं सोनं मात्र नक्की केलं आहे.. भीमाई चित्रपटाची गाणी ध्वनीमुद्रीत झाली आहेत ह्या चित्रपटात सिनेगायक  सुरेश वाडकर मुंबई , सिनेगायिका नेहा राजपाल मुंबई व इजि.कु. दक्षता दवणे आदी गायकांनी गायले आहे.... ह्या चित्रपटाचे पोस्टर ही लान्च झाले आहे.गाणी नादमधुर आहेत " आजिवासन "रेकार्डींग स्टुडीओ सांताक्रूझ मुंबई येथे पार पडले... साऊंड रेकॉर्डींस्ट प्रकाश माने मुंबई संगीत:-संदीप भूरे यांच लाभलं आहे.           या यशाबद्दल प्राचार्य मारोती पिन्नरवार सर गुरुवर्य प्रा.बाबूराव उपलवार,पी.पी.गायकवाड , जाफर आदमपूरकर, काशिनाथ वाघमारे , मारोती भुसावळे , दिलिप भसावळे , डॉ.विलासराज भद्...

बिलोली तालुक्यातील केरूर येथील एकास कोरोनाची लागण

न.प येथे स्थापन केलेल्या सी.सी.सी केंद्रात उपचार सुरू  .... बसवंत मुंडकर बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथुन जवळच असलेल्या केरूर येथील एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट पाँझीटिव्ह आला आहे.सदर रूग्णावर बिलोली नगर परिषदेच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दोन महिन्याच्या अवधिनंतर तालुक्यात कोरोनाचा पाँझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे.प्रशासनाच्या वतीने सयंम बाळगण्याचे अवाहन करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी हैद्राबादहून नांदेड येथे आलेल्या एका व्यक्तीने नांदेड येथील लंगर परिसरात काही काळ व्यथित केला.त्यानंतर नांदेड हून नरसी पर्यंत तीनचाकी अँटोने व नरसी हून बिलोली पर्यंत ट्रक ने प्रवास केलेल्या सदर व्यक्तीस कोरोना सदृष लक्षणे आढळून आल्याने सदर रूग्णास बिलोलीच्या सी.सी.सी केंद्रात दाखल करून त्याची चाचणी करण्यात आली.प्रथम घेण्यात आलेल्या चाचणीत सदर रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता.माञ लंगर परिसरातील काही व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्याने व आपणासही तशीच लक्षणे दिसत असल्यामुळे त्या रूग्णाने स्वतच पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती.रूग्णाच्...

संदीप भुरे यांच्या गीताचे सिनेतारका वर्षा उसगांवकर हस्ते मंगळवेढा येथे विमोचन....

नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर यांच्या 'हे लंबोदरा तू आल्यांवर' या गणपती गीताचे ख्यातनाम सिनेतारका वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते 'दामाजी एक्स्प्रेस' मंगळवेढा येथे विमोचन करण्यात आले. या गीताचे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार विशाल पाटील, सह दिग्दर्शक अमोल वाघमारे, ध्वनिमुद्रक प्रकाश माने (मुंबई) व हिंदी टिञपटाचे संगीतकार प्रशांत सिंग(मुंबई)यांचे या गीताला संगीत संयोजन लाभले आहे. गायक सिद्धार्थ गजघाटे यांनी गायिले आहे. 'हे लंबोदरा तू आल्यांवर' हे गणपती गीत सर्व रसिक मिञांना नक्की आवडेल. याबद्दल माजी उपसरपंच व पञकार काशिनाथ वाघमारे, कवी,गीतकार जाफर  आदमपूरकर, पञकार रियाज शेख, रमाकांत महाराज, सुरेश जाधव, संजय जाधव, दिलीप भुरे, गोपाळ म्हेञे, प्रा. बाबुराव उप्पलवार, प्राचार्य मारोती पिन्नरवार, प्रा. खुशाल उप्पलवार, प्रा. सुनिल भुरे, महायान सावळे, आदिंनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

कुंडलवाडीत पुन्हा एक कोरोना पाॅझिटीव्ह

  कुंडलवाडी मो.अफजल दि.12 ऑगस्ट रोजी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळले त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले. कुंडलवाडी शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी यांना गेल्या दोन तीन दिवसापासून अशक्तपणा सर्दी,ताप अदी जानवत असल्याने ते स्वता अॅटिजन रॅपिड टेस्ट करून घेतले असता अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे उद्या तपासणी करण्यात येणार असे पण डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.

का रं देवा मराठी चित्रपटास संदीप भुरेचं संगीत

  नांदेड-   का रं देवा  ह्या मराठी चित्रपटातील   चार गाणी असुन मुंबई  येथे  नुकतेच ध्वनीमुद्रण झाले आहे   निर्माता प्रशांत शिंगटे   दिग्दर्शक रणजीत जाधव ,संगीत संदीप भुरे ,गायक - महागायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे ,डॉ नेहा राजपाल, मधुर शिंदे ,सुप्रिया सोरटे प्रोग्रामर प्रशांतसिंग रेकॉर्डिस्ट प्रकाश माने हे आहेत

बिलोली पंचायत समिती पोट निवडणूकीत भाजपाचे वर्चस्व कायम

बिलोली तालूक्यातील अटकळी गणातून भाजपचे उमेदवार सौ.अर्चना मारोती शट्टीवार १५५५ मताने विजयी झाले असून कॉग्रेसचे पोटनिवडनूकीत सूध्दा हार झाली आहे. अटकळी गणा मध्ये कु.भाग्यश्री अनपलवार यांची शासकीय सेवेत नियूक्ती झाल्याने त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने अटकळी गणातील पंचायत समिती सदस्य पद रिक्त होते . सदरिल रिक्त असलेली जागा पंचायत समाती सदस्या साठी पोट निवाडणूकीचे मतदान काल २३ जून २०१९ रोजी घेण्यात आले होते तर आज सकाळी निकाल घोशीत करण्यात आले. कॉग्रेस उमेदवाराला  २७८८ मते मिळाले व भाजप चे उमेदवार सौ .अर्चना मारोती शेट्टी यांना ४३४३ मते मिळाली असून १५५५ मतांनी निवडून आल्याचे निवडणूक विभागाकडून घोशीत करण्यात आले . तालूक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी सौ शट्टीवार यांचे विजयी मिरवणूक वाजत गाजत फटाक्याच्या अतिष बाजीने काढण्यात आले. यावेळी  बाळासाहेब, पाटील यादवराजी तूडमे , रवि पाटील खतगावकर , निरंजन पाटील  खतगावकर ,अनंदपाटील बिराजदार .बाबाराव रोकडे, दत्ताराम बोधने, उमाकांत गोपछडे, गंगाधर अनपलवार, इंद्रजीत तूडमे, श्रीनिवास पाटील, सय्यद रियाज ,बळवंत पाटील लूटे , लालू ...

देगलूर- बिलोली विधानसभेत कॉग्रेस कडून जगदिश कदमचा नवा चेहरा?

बिलोली (सय्यद रियाज)  लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या काही दिवसात या निवडणुका होऊ घातल्या आहेत.  देगलूर - बिलोली  विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक कॉग्रेसचे जगदिश कदम यांनी दाखवली आहे .  विधानसभेची उमेदवाराकडून तयारी चालू आहे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघा मध्ये कॉग्रेस कडून अनेकांक ईच्छूककांनी मुलाखती दिल्या , तर नायगाव तालूक्यातील , पिंपळगाव येथील यूवा उमेदवार कॉग्रेसचे कार्यकर्ते व  माजी मुख्यमंञी अशोक चव्हान यांचे कट्टर समर्थक म्हणुन परिचित आहेत  यांनी विधानसभेत मोर्चे बांधानीला जोरदार तयारी चालू केली. गेल्या अनेक वर्षा पासून समाजकार्य राजकारणात सक्रिय आहे ते समाज कार्यकरत आहे. 1999 पासून कॉग्रेस  पक्षाच्या माध्यमातून कार्यकरत आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणून लढवण्यास तयार असल्याचे मराठी लाईव्ह न्यूज शी बोलतांना सांगितले.