अर्जापूर: १७ सप्टेंबर रोजी पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे कै.अॅड अनिल गोधमगांवकर यांच्या पुण्यस्मरणार्थ दहावी बारावी उत्तीर्ण तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मनोहरराव देशपांडे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनराव दमकोंडावार उपस्थित होते .यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख एकवीसशे रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक श्रीरामे व सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी कै. ॲड गणपतराव गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ पानसरे महाविद्यालयाची कु.प्रतीक्षा मंचल वाड हिने वाणिज्य शाखेतून ८९.७ टक्के गुण प्राप्त केले ती तालुक्यातून बारावीत प्रथम आल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच कै. प्रमिलाताई गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ तालुक्यातून प्रथम आलेली लिटिल फ्लाॅवर कॉन्वेंट स्कूल बिलोलीची कु.दुर्गेश्वरी ढगे हीस ९७ टक्के गुण प्राप्त मिळविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.तर इयत्ता दहावीतून पहिला आलेला सैनिकी विद्यालय सगरोळीचा शिवकुमार शिंदे यास ९६.६० टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल त्याला कै.डॉ.अरुण गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ सन्मानित केले तर कै. ॲड अनिल गोधम गांवकर यांच्या स्मरणार्थ पानसरे महाविद्यालयाचे विद्यार्थी शेख समीर दस्तगीर बारावी विज्ञान शाखेतून ८७.५३ टक्के तर स्वप्निल घाटे याने बारावी कला शाखेतून ८१.३७ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम ध्वजारोहण व विद्यापीठ गीतानंतर घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोपाळ चौधरी यांनी केले या प्रसंगी सर्वांनी मास्क व सोशल डिस्टंसिंग चा वापर केला होता.
बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....! बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!! मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा